भाजपने उत्पल पर्रिकरांना तिकीट दिल्यानंतर शिवसेनेसह सर्व पक्ष तिथे उमेदवार देणार नाही का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी चंद्रकांत पाटलांवर पलटवार केला. याबाबत ते कोण सांगणार? जे बोलत आहेत, त्यांच्या हातात काहीही नाही. उत्पलला तिकीट द्यायचं असतं तर तेव्हाच दिलं असतं. हे बोलघेवडे आहेत. तिकीट का थांबवलं हा मोठा प्रश्न . उत्पल पर्रिकर अपक्ष राहत असतील तर त्यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये एवढंच आमचं म्हणणं होतं. एखाद्या नेत्याबाबत सहानभूती असते. एखाद्या नेत्याच्या कुटुंबातून कोणी उभे राहत असतील तर आपण उमेदवार देत नाही. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. तिच गोव्याची आहे, असं राऊत म्हणाले. संजय राऊत यांच्या या विधानावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संजय राऊत सकाळी एक, संध्याकाळी एक बोलतात.