मुंबई : पंकजा मुंडे सर्व पदांसाठी पात्र आहेत, असे म्हटल्यावर इतर कोणीही त्या जागेसाठी पात्र नाही, असे म्हणण्याचे काही कारण नाही. पण पात्र असणे आणि त्यांच्यावर जबाबदारी देणे यात अंतर आहे, असा टोला धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. राज्यसभेच्या उमेदवारीवरून सध्या विविध पक्ष आणि त्यांचे राजकारण पाहायला मिळत आहे. यात राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीविषयी वक्तव्य केले. त्याला धनंजय मुंडे यांनी टोला लगावत टीका केली आहे.