एप्रिल-मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात ऑक्सिजनची कमतरता होती. ऑक्सिजनअभावी अनेकांचा जीवही गेला. त्यांच्या नातेवाईकांचा संताप मीडियाने देशाला दाखवला. पण आता ऑक्सिजन अभावी एकाचाही मृत्यू झालेला नाही, असं केंद्र सरकार म्हणालं आहे. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच झुंपली आहे. या प्रकरणावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !