केंद्र सरकाच्या धोरणामुळेच कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाल्याचं विधान सीरमचे संचालक सुरेश जाधव यांनी केलं आहे. त्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटलंय. त्यावर भाजप नेत्यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र, या आरोप-प्रत्यारोपावरुन लसींचा तुटवडा आणि नियोजनाचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे.