राज्यात मध्यावधी निवडणुका अटळ असल्याचे संकेत जयंत पाटील यांनी दिले आहेत. अपात्र आमदारांचं निलंबन होणार आणि सरकार कोसळणार असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. तर मंत्रिपदासाठी शिंदे गटापेक्षा भाजप आमदारांमध्ये अधिक अस्वस्थता आहे, असंही ते म्हणाले. मंत्रिपद न मिळालेले भाजप आमदार अधिक अस्वस्थ आहेत, असं जयंत पाटील म्हणाले.