उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा… काय घडलं?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा… काय घडलं?

| Updated on: Jul 28, 2026 | 11:29 AM

महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्र्यांनी केलेल्या कामांचा आता सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच आपल्या पक्षातील मंत्र्यांसोबत बैठक घेणार असून गेल्या दीड वर्षातील कामगिरीची समीक्षा करणार आहेत. या बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्र्यांनी केलेल्या कामांचा आता सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच आपल्या पक्षातील मंत्र्यांसोबत बैठक घेणार असून गेल्या दीड वर्षातील कामगिरीची समीक्षा करणार आहेत. या बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्र्यांनी त्यांच्या खात्यांमध्ये केलेली विकासकामे, प्रलंबित निर्णय आणि जनतेशी संबंधित योजनांची अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. ज्या विभागांबाबत तक्रारी आल्या आहेत, त्या मंत्र्यांकडूनही स्पष्टीकरण मागितले जाण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे अचानक उपमुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना बोलवणी धाडली आणि नंतर दीड वर्षांचा हिशोब विचारणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सरकारच्या कामकाजाला अधिक गती देण्यासाठी आणि आगामी काळातील नियोजन निश्चित करण्यासाठी हा आढावा महत्त्वाचा मानला जात आहे. तसेच प्रत्येक मंत्र्यांच्या कामगिरीचे स्वतंत्रपणे मूल्यांकन करणे गरजेचे असते. काही आमदारांनी तक्रार केल्यानंतर शिंदेंनी हा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काळात कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे, याबाबतही मार्गदर्शन करणार आहेत. सरकारच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आणि जनतेपर्यंत योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचावा, यासाठी हा आढावा निर्णायक ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Jul 28, 2026 11:29 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us