स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 जुलै रोजी 50 हजार रुपये जमा होणार होते. मात्र, प्रोत्साहनपर अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाही, त्यामुळे ते आक्रमक झाले आहेत. येत्या 9 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना 50 हजार मिळाले नाही, तर क्रांती दिनादिवशी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. यावेळी त्यांनी बेमुदत आंदोलन करून पुणे-बेंगळूर महामार्ग रोखून धरू अशा इशाराही त्यांनी दिला आहे. उद्या ते मुंबईला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा असंही ते सांगणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.