उत्तर प्रदेशसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केलीय. त्यानंतर पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात प्रियंका यांनी लखीमपूरच्या घटनेवरुन पंतप्रधानांना तिखट प्रश्न विचारले आहेत. लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी तुमच्या पक्षाच्या राज्यमंत्र्यांचा मुलगा आहे. आजच्या कार्यक्रमात राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यासोबत तुम्ही कार्यक्रमात सहभागी होऊ नका, असं आव्हान प्रियंका यांनी मोदींना दिलंय.