कोणीही कुठलाही नेता जगाने त्याला कितीही उपाध्या देवो, जाणता राजा बोलो. तो आमचा गुरु होऊ शकत नाही. आमचा गुरु फक्त बाळासाहेब ठाकरेच. आघाडीचे नेते आघाडी सभांळतील आपल्याला ग्रामपचांयत, पचांयत समिती, जिल्हा परिषद सभांळायची आहे. उद्या आघाडी तुटलीच तर आपण तटकरेकडे जायचे का, आपण आपल्याच घरी येणार. म्हणून आपल्याला आपला पक्ष बळकट करायचा आहे, आघाडी नाही. माजी केद्रिंय मंत्री अनंत गिते यांनी श्रीवर्धनमध्ये पक्ष प्रवेश सोहळ्या दरम्यान आघाडी सरकारवर घाणागाती टिका करुन येत्या ग्रामपचांयत, पचांयत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळाचा नारा दिला आहे.