मंडल आयोगासाठीचा लढा दलितांनी लढला. ओबीसी या लढ्यात मागे होते, असं विधान राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूष करणारे कंत्राटी कामगार आहेत, अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी, मंडल आणि आरक्षण या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाडांवर जोरदार टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणतात माझा ओबीसीवर विश्वास नाही. कारण मंडल आयोग येताना ते लढले नाहीत. आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला होता.