मुंबई: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि आयोगावरील सदस्यांची नियुक्ती या मुद्यावरुन राज्य सरकारवर टीका केलीय. प्रस्थापितांच्या राज्य सरकारनं बहुजन विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलाय. विधानसभेत मोठ्या मोठ्या घोषणा करणाऱ्या अजित पवारांनी विद्यार्थ्यांची फक्त दिशाभूल केल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.