राज्यपालांनी केलेलं वक्तव्य तर्कहीन- छगन भुजबळ

राज्यपालांनी केलेलं वक्तव्य तर्कहीन- छगन भुजबळ

| Updated on: Jul 30, 2022 | 11:41 AM

अहमदाबादमध्ये ज्या वेळेला 60-70 कापड गिरण्या होत्या वेळेला मुंबईतही 64 गिरण्या होत्या. मुंबईचं हवामान हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. तिन्ही बाजूंनी समुद्र असल्यामुळे थंड आणि गरम असं तीव्र वातावरण नसतं.

नाशिकः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मुंबई आणि मराठी माणसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सर्वच राजकीय पक्षांकडून टीका होत आहे. नाशिकमध्ये बोलताना छगन भुजबळ म्हणाले, ‘ गुजरात आणि राजस्थानमध्ये मुळात व्यापारी समाज आहे. राजस्थानमध्येही काही भागात वाळवंटच आहे. ते लोक बाहेर पडलेले आहेत. बिर्लांचा इतिहास पाहिला, तर ते राजस्थानमधून कलकत्याला गेले. मुंबईतही ही सगळी मंडळी आली आणि हे महत्त्व वाढलं. पण मुंबईच्या मराठी माणसांचे (Mumbai Marathi People) कष्ट विसरता येत नाही. मुंबईत नाशिकमधून पाणी, पुण्यातून भाजीपाला, वीज राज्यभरातून जाते. त्यामुळे ती नसेल तर काय होईल, असा प्रश्न विचारता येईल. अहमदाबादमध्ये ज्या वेळेला 60-70 कापड गिरण्या होत्या वेळेला मुंबईतही 64 गिरण्या होत्या. मुंबईचं हवामान हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. तिन्ही बाजूंनी समुद्र असल्यामुळे थंड आणि गरम असं तीव्र वातावरण नसतं. दिल्लीसारखं हवेचं प्रदुषण नसतं. एका बाजूनी हवा आली की दुसऱ्या बाजूने निघून जाते. मुंबईची बंदरं, विमानतळं, बॉलिवूडचं (Bollywood) महत्त्वही खूप आहे. यात फक्त गुजरात आणि राजस्थानचे लोक नाहीत. त्यामुळे राज्यपालांनी केलेलं वक्तव्य तर्कहीन असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली.

 

 

 

Published on: Jul 30, 2022 11:41 AM