Navi Mumbai | गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC फळबाजारात दहा हजार आंब्याच्या पेट्या दाखल

| Updated on: Mar 19, 2026 | 2:21 PM

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC फळबाजारात कोकणातून आलेल्या हापूस आंब्याची अवाक या वर्षी अपेक्षेपेक्षा खूपच कमी झाली आहे. या वर्षी फक्त 10 हजार पेटी आंबा आला, तर साधारण दरवर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर एक लाख पेटी हापूस आंब्याची आवक बाजारात होत असे. कोकणातून आलेल्या आंब्यांची व्यापाऱ्यांनी विधिवत पूजा केली आणि पारंपरिक उत्साहाने त्याचे स्वागत केले.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC फळबाजारात कोकणातून आलेल्या हापूस आंब्याची अवाक या वर्षी अपेक्षेपेक्षा खूपच कमी झाली आहे. या वर्षी फक्त 10 हजार पेटी आंबा आला, तर साधारण दरवर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर एक लाख पेटी हापूस आंब्याची आवक बाजारात होत असे. कोकणातून आलेल्या आंब्यांची व्यापाऱ्यांनी विधिवत पूजा केली आणि पारंपरिक उत्साहाने त्याचे स्वागत केले.
यावर्षीच्या अवकाळी परिस्थितीमुळे कोकणातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दरवर्षीच्या तुलनेत फक्त 10 टक्के माल बाजारात उपलब्ध झाला आहे. यामुळे आंब्यांचे भाव वाढले असून शेतकरी आणि व्यापारी चिंतेत आहेत. दरम्यान, मुंबईतील बाजारपेठेत उत्साही ग्राहक आणि व्यापारी पाडव्याच्या रंगत आणि पारंपरिक विधींच्या वातावरणात सहभागी झाले आहेत. कमी आवक असूनही उत्साहाने लोकांनी आंब्याचे स्वागत केले आणि पारंपरिक सणाच्या रंगत कायम ठेवली आहे.

Published on: Mar 19, 2026 02:20 PM
Follow Us