मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील हल्लाच्या कोणताही कट नसल्याचे आता समोर आले आहे. तर चौकशीनंतर हॉटेलमालकाशी झालेल्या वादात एका तरूणाने दारीच्या नशेत खोटी माहिती दिल्याचे उघड झाले आहे. तर यानंतर पोलिसांनी त्या तरूणाला सोडून दिले आहे. तर शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे. तसेच आपण हस्तक्षेप केला असता तर शिंदे गटाचाच दसरा मेळावा तेथे झाला असता असेही ते म्हणाले आहेत. तर खासदार प्रतापराव जाधव यांनी मातोश्रीबद्दल वक्तव्य केलं आहे. वाझेकडून वसूलीचे 100 कोटी मातोश्रीवर जात होते असं म्हटलं आहे. मात्र यानंतर जाधव यांनी आपल्या वक्तव्यावरून घूमजाव केला आहे.