Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान

Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान

| Updated on: Jun 19, 2026 | 10:12 PM

शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत पक्षाच्या नेतृत्वाबाबत मोठे विधान केले. यावेळी त्यांनी पक्षातील अलीकडील घडामोडी, नेतृत्वावर होणारी टीका आणि शिवसैनिकांचा विश्वास यावर सविस्तर भूमिका मांडली.

शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत पक्षाच्या नेतृत्वाबाबत मोठे विधान केले. यावेळी त्यांनी पक्षातील अलीकडील घडामोडी, नेतृत्वावर होणारी टीका आणि शिवसैनिकांचा विश्वास यावर सविस्तर भूमिका मांडली.

मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी न्यायव्यवस्था, राजकीय परिस्थिती आणि लोकशाही संस्थांबाबत चिंता व्यक्त केली. तसेच पक्षाच्या भविष्यासाठी स्थानिक पातळीवरील नेतृत्व अधिक सक्षम होण्याची गरज असल्याचे सांगत, आमदार-खासदारांनी स्वतः जबाबदारी स्वीकारून निवडणुका लढवाव्यात, असे आवाहन केले.

मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामांचा उल्लेख करताना त्यांनी नैसर्गिक आपत्ती, पूरस्थिती, कर्जमाफी योजना, शिवभोजन योजना आणि कोरोना काळातील प्रशासनाची भूमिका यांची आठवण करून दिली. संकटकाळात जनतेसोबत उभे राहणे हीच शिवसेनेची परंपरा असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबाच्या सामाजिक कार्याच्या इतिहासाचाही उल्लेख केला. संकटाच्या काळात समाजासाठी काम करण्याची परंपरा ठाकरे कुटुंबात असल्याचे सांगत, जनतेच्या सेवेसाठीच राजकारण केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नेतृत्वावर होणाऱ्या आरोपांना उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसैनिकांचा विश्वास असेपर्यंतच आपण पक्षाचे नेतृत्व करणार आहोत. “जर माझ्यावर झालेले आरोप खरे असतील आणि शिवसैनिकांना माझे नेतृत्व नको असेल, तर मी पद सोडण्यास तयार आहे,” असे स्पष्ट विधान त्यांनी केले.

तसेच, शिवसेना कोणत्याही परिस्थितीत विचारधारेपासून दूर जाऊ देणार नसल्याचा निर्धार व्यक्त करत, पक्षावर प्रेम करणाऱ्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनी एकजूट राहण्याचे आवाहन केले. अनेक संकटे आणि वादळे आली तरी आपण खचणार नाही, पक्षासाठी आणि शिवसैनिकांसाठी ठामपणे उभे राहू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या भावनिक भाषणामुळे मेळाव्यातील वातावरण भारावून गेले असून, त्यांच्या नेतृत्वाबाबत केलेल्या वक्तव्याची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Published on: Jun 19, 2026 10:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us