आघाडीचे सरकार आहे. एकत्र बसून विषय घेऊ आणि प्रश्न सोडवू असे राऊत म्हणाले. छगन भुजबळ शिवसेनेत राहिलो असतो तर मुख्यमंत्री झालो असतो असे म्हणाले होते. यावर राऊत म्हणाले की, छगन भुजबळ बरोबर बोलतायत. शिवसेनेने अनेक सामान्य लोकांना मंत्री, मुख्यमंत्री बनवले. मात्र, अनेक दुर्दैवी लोक आहेत. ते इतर पक्षात जाऊन त्यांच्या नशिबी काय आले. ठीक आहे कोणी मंत्री झाले, कोणी केंद्रात गेले. मात्र, शिवसेनेच्या वर्तुळात राहून काम करणं महत्त्वाची गोष्ट असते. छगन भुजबळ आज आहेत त्यापेक्षा सर्वोच्च स्थानी गेले असते, असे राऊत म्हणाले.