Imtiaz Jaleel | अनेक ठिकाणी आमचा तिरंगा मोर्चा अडवला जातोय, इम्तियाज जलील यांचा आरोप

| Updated on: Dec 11, 2021 | 12:57 PM

मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएमच्या वतीनं तिरंगा मार्च काढण्यात आला आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात कार्यकर्ते औरंगाबादहून मुंबईकडे निघाले आहेत.

Follow us on

मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएमच्या वतीनं तिरंगा मार्च काढण्यात आला आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात कार्यकर्ते औरंगाबादहून मुंबईकडे निघाले आहेत. अहमदनगर बायपासहून मोर्चा पुण्याकडे निघाला आहे. आम्ही मुंबईतील सभेतील वेळ 5 ची दिली होती. मुस्लीम आरक्षणाच्या लढ्यासाठी आजपासून क्रांती सुरु झाली आहे. मुस्लीम आरक्षणासंदर्भात यावर मार्ग काढण्याची गरज आहे, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं. आम्ही या देशात राहतो, आम्हाला मुंबईला येणापासून रोखलं जातंय, असं इम्तियाज जलील म्हणाले.