मागील दोन वर्ष अप्रतिम खेळ दाखवून ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या संघाना पराभूत करुन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) अंतिम सामन्यात पोहोचलेला भारतीय संघ न्यूझीलंडकडून 8 विकेट्सने पराभूत झाला. पराभवचं खापर सर्वात जास्त कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) फोडलं जात आहे. दरम्यान विराटच्याच काही चूका भारताला महाग पडल्या असून त्यामुळे टीम इंडियाला इतक्या महत्त्वाच्या सामन्यात परभाव स्वीकारावा लागला आहे.