India – Turkey Conflict : भारत सरकारचा तुर्कीला मोठा दणका; तुर्की कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी रद्द

India – Turkey Conflict : भारत सरकारचा तुर्कीला मोठा दणका; तुर्की कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी रद्द

| Updated on: May 16, 2025 | 11:51 AM

India Action Against Turkey Company : भारत आणि तुर्कीतील संबंध गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात बिघडलेले आहेत. त्यातच भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरु असताना तुर्कीनं पाकिस्तानला जाहीर समर्थन दिल्यानंतर भारत सरकारनं तुर्कीला मोठा दणका दिला आहे.

भारतात 9 विमानतळांवर तुर्की कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी रद्द करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत तुर्की कंपनीचं कंत्राट रद्द करण्यात आलेलं आहे. सेलेबी आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांची सुरक्षा मंजूरी रद्द करण्यात आले आहे.

भारताने तुर्कीच्या सेलेबी ग्राउंड हँडलिंग कंपनीची सुरक्षा परवानगी रद्द केली आहे.ही कंपनी भारतातील 9 प्रमुख विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सेवा पुरवत होती. या निर्णयामागे राष्ट्रीय सुरक्षेचे कारण असल्याचं सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानसोबतचे संबंध ताणले गेलेले असताना तुर्कीने पाकिस्तानला जाहीर समर्थन दिलं आहे. त्यानंतर आता भारत सरकारनं तुर्कीला हा मोठा दणका दिला असल्याचं मानलं जात आहे.

Published on: May 16, 2025 11:51 AM