मुंबई : महागाईचा भडका, वाढलेले व्याज दर याच्यामुळे सर्वसामान्य माणूस बेजार झाला आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाचं घर म्हणजे हे स्वप्नच राहीलं का असा प्रश्न पडला आहे.य याच दरम्यान आता हे स्वप्न स्वप्नच राहणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच व्याजाचा दर वाढवल्यानंतर आता रेडिरेकनरचे दर ही वाढले आहेत. ज्यामुले ड्रिम हाऊसचे ड्रिम पाण्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रेडीरेकनरचे दर दहा टक्क्यांनी वाढणार आहेत. हे दर 1 एप्रिल पासून लागू होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हक्काचे घर या स्वप्नांना सुरुंग लागले आहेत.