जळगाव : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचं कारण सांगितलं आहे. मंत्रिपदाचा सट्टा लाऊन आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला, असं गुलाबराव पाटील म्हणालेत. “कामाला उत्तर द्या आणि कामानेच बोला. शेतकऱ्यांना आणि जनतेला काम हवंय. बोलबच्चन अमिताभ बच्चन नकोय… त्यामुळे खोके बोलून विकास होत नाही तर खोक्यांचा विकास झाला पाहिजे. खोके देऊन लोकांची काम केल्या गेली पाहिजे आणि ते काम मी करत असल्याचं म्हणत विरोधकांच्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे.