ठाणे : गेल्या काही दिवसापासून चंद्रशेखर बावनकुळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद होताना दिसत आहे. आजही आव्हाड यांनी बावनकुळे यांना सणसणीत प्रत्युतर दिलंय. यावेळी आव्हाड यांनी बावनकुळे यांचा प्राच्यपंडित ज्योतिष्य असा उल्लेख केला.
बावनकुळे यांनी आव्हाडांवर राधे राधे म्हटल तरी गुन्हा दाखल करता असा आरोप केला होता. त्यानंतर आव्हाड यांनी बावनकुळे यांना प्रत्युतर देताना, बावनकुळे हे प्राच्यपंडित ज्योतिष्य झालेले दिसताहेत. त्यांनी ज्योतिष्याचा महाविद्यालय काढावा, असा सल्ला त्यांनी दिला
तसेच पालघरच्या ज्युनिअर आयएएस यांचा दाखला देत त्या आदिवासी मुलांना राधे राधे म्हणा असे सांगत आहे. राधे राधे म्हटलं तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. तुम्ही जय आदिवासी म्हणू नका. जय आदिवासी म्हंटल तर काहीही मिळणार नाही, असं सांगते. हाच मुद्दा मी मांडला.