राज ठाकरेंच्या भोंगा मुद्यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. मशिदीवरील भोंगे बंद ठेवण्याबाबत मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. मात्र, आता मनसेच्या या भूमिकेमुळे पंढरपुरमधील विठ्ठल मंदिरातील काकड आरती स्पीकरविनाच होणार आहे. यामुळे आता भाविकांमध्ये देखील नाराजगी आहे. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत साईबाबा संस्थानला जिल्हा पोलिस प्रशासनाने स्पीकर लावण्याकरीता परवानगी दिली आहे. त्यामुळे दोन आरतीचा स्वर बंद झाला आहे. स्पीकरविना होणाऱ्या आरतीमुळे भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. आज पहाटे झालेल्या काकड आरतीवेळी आवाज येत नसल्याने भाविकांमध्ये कमालीचा संभ्रम पहायला मिळाला.