जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झालीय .ती जवळपास 20 फुटांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. चगंगा नदीच्या पाणी पातळीत एका रात्रीत तब्बल सात फुटांची वाढ झालेली पाहायला मिळते. तसेच कसबा बावड्यातील राजाराम बंधारा देखील पाण्याखाली गेलेला आहे. जिल्ह्यात धरण क्षेत्रात पावसाची संततधार पाहायला मिळते. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागालाही पावसाने झोडपून काढले. शेत कामाला वेग आला असताना पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची जराशी तारांबळ उडाली. पण पावसाच्या आगमनाने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. | Kolhapur Rain Update Water Level Of Rivers Increases