अमरावतीमधील चिरोडी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. रहिवासी वस्तीत शिरून दोन बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. बिबट्या गावात शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत ग्रामपंचायती मार्फत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.