Nana Patole | तिरंगा तर डीपीवर ठेऊच, पण देशाच्या GDP चं काय? नाना पटोले यांचा रोकडा सवाल

| Updated on: Aug 07, 2022 | 4:43 PM

Nana Patole | तिंरगा तर डीपीवर ठेऊच, पण देशाच्या जीडीपीचं काय? असा रोकडा सवाल नाना पटोले यांनी विचारला आहे.

Follow us on

Nana Patole | तिंरगा हा व्हॉट्सअपच्या डीपीवर (DP)भारतीय नागरीक ठेवलंच, पण देशाच्या जीडीपीची (GDP) चिंता कोणी वाहायची? जीडीपीत सुधारणा कधी होणार असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विचारला आहे. तसेच त्यांनी केंद्र सरकारच्या (Center Government) धोरणांवरही यावेळी जोरदार टीका केली. केंद्रातील भाजप सरकार फक्त मतांसाठी ओबीसींचा (OBC) वापर करते. पण ओबींसीची जनगणना असेल अथवा इतर क्षेत्रात ओबीसीची टक्का वाढवण्यासाठी कुठलाच अजेंडा या सरकारकडे नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. अग्निपथ ही योजना ओबीसींना आरक्षणाचा लाभ मिळू नये यासाठीच सुरु केल्याचा आरोप ही त्यांनी केला. अग्निपथ सारख्या योजना खासगीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या असल्याचे ते म्हणाले. ओबीसी समाज हा शेतीशी जोडलेला आहे आणि आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. तिंरगा हा व्हॉट्सअपच्या डीपीवर भारतीय नागरीक ठेवलंच, पण देशाच्या जीडीपीची चिंता कोणी वाहायची? जीडीपीत सुधारणा कधी होणार असा सवाल त्यांनी केला.