मुंबई पुण्यातील परिस्थिती पाहूनचं शाळेचा निर्णय घेतला जाईल. ओमिक्रॉनच्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. शाळा सुरु करण्यासाठी आम्ही नियमावली टास्क फोर्सशी चर्चा करुन बनवली आहे. अनेक बारीक गोष्टींचा विचार करुन नियमावली बनवली आहे. मुंबई पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय़ घेतला जाईल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. राज्यात 1 डिसेंबरपासून शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र, पुणे आणि मुंबईतल्या शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला होता.