संदीप राजगोळकर, TV9 मराठी, प्रतिनिधी, नवी दिल्ली : सध्या राज्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Government Politics Crisis) सुनावणी सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयात लंच ब्रेक नंतर पुन्हा सुनावणी सुरु झाली आहे. ठाकरेंच्या वकिलांकडून युक्तिवाद झाला. त्यानंतर शिंदे गटाकडून नीरज कौल यांनी युक्तीवाद झाला. त्यानंतर लंच ब्रेक झाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुनावणीला सुरूवात झाली आहे. थोड्याच वेळात कल समजू शकेल, असं सर्वोच्च न्यायालयातल्या (Supreme Court) वकिलांचं म्हणणं आहे.