Rain Update | महाराष्ट्रात मान्सूनची संथ वाटचाल; 24 जूननंतर कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
राज्यात सध्या मोसमी पावसाची वाटचाल अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 4 ते 5 दिवस राज्यातील काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात सध्या मोसमी पावसाची वाटचाल अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 4 ते 5 दिवस राज्यातील काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 24 जूननंतर कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर राज्यातील इतर भागांमध्ये अद्यापही उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, ठाणे शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणीसाठ्यात घट झाल्यामुळे पाणी कपात वाढवण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे. सध्या ठाण्यात 15 दिवसांत 12 दिवस पाणीपुरवठा शटडाऊन करण्यात येत आहे.
मात्र आगामी काळात आठवड्यात 24 तासांचा पाणी शटडाऊन लागू करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या भातसा धरणात केवळ 11 टक्के आणि बारवी धरणात 24 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे.
या परिस्थितीमुळे ठाणे आणि परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
