यवतमाळ- तुम्ही सांगितल्या प्रमाणे कष्टकऱ्यांचे बियाणे उगवले नाही, तसेच त्या बियाणाला योग्य मोबदला मिळाला नाही तर तुम्हाला XXX करून मारल्याने शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS)गप्प बसणार नाही असा इशारा मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिला आहे. शेतकर्यांना(farmers) बियाण्याच्या कंपन्यांनी चांगलया प्रतीचे बियाणे देण्यात यावे असे फर्मान बियाण्याच्या कंपन्यांकडून मनसेला देण्यात येत आहे. तशी पत्रही कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे,. विदर्भात शेतकरी सर्वाधिक आत्महत्या (farmers Suicide)करत असलेले आपण पाहिले आहे. याचे मूळ कारण शेती आहे. शेतीत चांगले उत्त्पन्न निघत नाही तसेच निघाले तर त्याला योग्य तो हमी भाव मिळत नाही. त्यामुळे आता मनसेने शेतकरी प्रश्नाच्या मुळापर्यंत जाण्याचे ठरवले आहे. असे मत राजू उंबरकर यांनी व्यक्त केले आहे.