मुंबईः राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत. राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता उद्यापासून 15 दिवस कडक लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील, असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय.