महाराष्ट्र अंधारात जाऊ देणार नाही, अशी ग्वाही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्यात 24 तास अखंड विजेचा पुरवठा करतोय, असं त्यांनी म्हटलं आहे. राऊत म्हणाले की, राज्यात वीजनिर्मितीसाठी कोळसा स्थिती बीकट आहे, मात्र आमचे प्लांट बंद होणार नाहीत अशी व्यवस्था उभी केली आहे. कोळशाअभावी एकही संच सध्या बंद नाही. दिवाळीत राज्यावर वीज संकट येऊ देणार नाही, असा विश्वास राऊत यांनी राज्यातील नागरिकांना दिला. (Maharashtra will not face power crisis: Energy Minister Nitin Raut)