ममता बॅनर्जींचा नंदीग्राममधून पराभव, निकालात छेडछाड केल्याचा आरोप

| Updated on: May 02, 2021 | 8:44 PM

ममता बॅनर्जींचा नंदीग्राममधून पराभव, निकालात छेडछाड केल्याचा आरोप

Follow us on

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. मात्र, नंदीग्राम येथून ममता  बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. त्यांचा 1953 मतांनी पराभव केला. मात्र हा पराभव ममता यांना मान्य नसून त्या या निकालाविरोधात नायालयाचे दार ठोठावणार आहेत. त्यांनी निकालात छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, तृणमूलने न्यायालयात जाण्याची भूमिका घेतल्यामुळे पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.