सुसंस्कृत पक्ष म्हणून स्वत:ची इमेज निर्माण करणाऱ्या भाजपानं ती प्रतिष्ठा पूर्णत: धुळीला मिळवलीय. ती भारतीय ट्रोलर्स पार्टी झाली आहे. रश्मी ठाकरे (Rashmi thackeray) कोणाच्याही राजकीय निर्णयात नसतात. अशावेळी रश्मी ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त ट्विट करणाऱ्यांचं ट्विटर अकाऊंट बंद करावं व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी केलीय.