Maratha Reservation | रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची महत्त्वाची बैठक; फडणवीसांसह…

Maratha Reservation | रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची महत्त्वाची बैठक; फडणवीसांसह…

| Updated on: Sep 08, 2026 | 10:38 AM

मराठा आरक्षणाबाबत वर्षा बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. सूत्रांनुसार, रात्री २ वाजेपर्यंत चाललेल्या या बैठकीत मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सकारात्मक विचारविनिमय झाला. मात्र, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, याचीही खबरदारी घेण्यावर भर देण्यात आला. जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या ११ व्या दिवशी ही घडामोड घडली.

काल रात्री वर्षा बंगल्यावर मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ही चर्चा रात्री २ वाजेपर्यंत सुरू होती. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती होती. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण आणि प्रसाद लाड यांचा समावेश होता.

या बैठकीत प्रामुख्याने मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर मराठा समाजाला न्याय देताना इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजावर कोणताही अन्याय होणार नाही, या मुद्द्यावरही भर देण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही भूमिका स्पष्टपणे मांडली. सध्या मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून, त्याचा आज ११ वा दिवस आहे. त्यांची तब्येत खालावली असून, त्यांनी मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आगामी मंत्रिमंडळ बैठकीनंतर यासंदर्भात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

 

Published on: Sep 08, 2026 10:37 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us