बीड : कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बाजारासह गर्दीचे ठिकाण पुर्णत: बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी आजही आठवडी बाजार भरतात. माजलगाव येथील नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांनी बाजार उठवण्याचा प्रयत्न केला असता भाजीपाला विक्रेत्यांसह व्यापारी आणि प्रशासनातील अधिकार्यात तू तू मै मै होत शेतकर्यांनी अख्खा बाजार रस्त्यावर फेकून प्रशासनाचा निषेध केला. भाजीपाला रस्त्यावर फेकल्यानंतर अक्षरशः चिखल झाला होता.