मालाडमध्ये झालेल्या दुर्घटनेची माहिती घेण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी भाजपकडून होत असलेल्या आरोपांबाबत महापौरांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजप काय म्हणतंय ना ते भौ भौ काय करायचं ते त्यांना करत राहू दे. कारण शिवसेना हे करते ते करते असं ते सांगत आहेत. हे अगदी दूध के धुले आहेत नो प्रॉब्लेम, असा चिमटा महापौरांनी काढला. पहिल्याच पावसात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी भरले होते. त्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेचाही किशोरी पेडणेकर यांनी समाचार घेतला. मुंबईत पाणी भरलं रे भरलं की विरोधकांच्या अंगात वारं भरतं, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.