Raj Thackeray : त्यांचा पत्त्याचा बंगला उलटा, खालचा पत्ता कोणाचा? राज ठाकरे यांचा रोख कुणावर अन् कुणाला लगावला टोला?

Raj Thackeray : त्यांचा पत्त्याचा बंगला उलटा, खालचा पत्ता कोणाचा? राज ठाकरे यांचा रोख कुणावर अन् कुणाला लगावला टोला?

Harshada Shinkar | Updated on: Jan 09, 2026 | 1:43 PM

राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या मस्तीवर टीका केली, त्यांच्या कामांचा पाया नरेंद्र मोदींच्या नावावर असलेला पत्त्यांचा उलटा बंगला असल्याचे म्हटले. त्यांनी अटल सेतू, मेट्रो यांसारख्या मोठ्या प्रकल्पांचे श्रेय काँग्रेसला दिले. शहरांमधील अनियंत्रित लोकसंख्या वाढ हाच विकास योजनांच्या अपयशाचे मूळ कारण असल्याचेही ठाकरे यांनी अधोरेखित केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. मुंबईतील विकासकामांचे श्रेय घेण्यावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले. ठाकरे म्हणाले की, अटल सेतू, विलासराव देशमुख फ्रीवे आणि मेट्रो प्रकल्पांची पायाभरणी काँग्रेसच्या काळात झाली होती. मनमोहन सिंग यांनी मुंबईला आर्थिक केंद्र बनवण्याची योजना आखली होती, जी गुजरातला नेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांच्या मस्तीवर टीका करताना राज ठाकरे यांनी त्यांना मोदी आणि ईव्हीएमचा आधार असल्याचे म्हटले. ते म्हणाले, “सध्याच्या सरकारचा पत्त्यांचा बंगला उलटा आहे आणि त्याचा खालचा पत्ता नरेंद्र मोदींचा आहे. लोक आज भारतीय जनता पक्षाला मतदान करतात, ते फक्त मोदींच्या नावावर करतात, इतर कोणाच्या नावावर नाही.” ठाकरे यांनी मुंबईतील वाढत्या लोकसंख्येच्या लोंढ्यांवर चिंता व्यक्त करत, यामुळे चांगल्या योजनाही विस्कळीत होत असल्याचे सांगितले.

Published on: Jan 09, 2026 1:43 PM
Follow Us