सातत्याने वादात सापडणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या ताफ्यावर पंजाबमध्ये हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी आंदोलकांनी कंगनाचा ताफा अडवला आणि तिने माफी मागावी अशी मागणी सुरू केली. सरकारने कृषी कायदे मागे घ्यावे यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात अभिनेत्रीने वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्यामुळे पंजाबमधील शेतकरी संतप्त झाले होते. तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये या घटनेचा संदर्भ देत कंगनाने सांगितले की, आंदोलकांनी तिच्या कारला घेराव घातला, त्यामुळे ती बराच वेळ तिथे अडकली होती. कंगनाने सांगितले की, हिमाचल सोडल्यानंतर मी पंजाबमध्ये प्रवेश करताच जमावाने मला घेरले आणि स्वत:ला शेतकरी म्हणवणाऱ्या लोकांनी शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली. (Mob attacks Kangana Ranaut’s car in Punjab)