नागपूर एसबीएल कंपनी स्फोटात मृतांचा आकडा वाढणार?
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राहुळगाव येथील एसबीएल कंपनीत डिटोनेटर बनवताना भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला असून १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमी महिला कामगार असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने मदत व चौकशीचे आदेश दिले आहेत.
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राहुळगाव येथील एसबीएल कंपनीत डिटोनेटर बनवताना भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत 17 कामगारांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जखमींमध्ये अनेक महिला कामगारांचा समावेश आहे, ज्यांना 40 ते 100 टक्क्यांपर्यंत भाजले आहे.
घडनास्थळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक तातडीने पोहोचले असून, मदतकार्याला वेग देण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीट करून स्थानिक प्रशासनाशी संपर्कात असल्याचे सांगितले आणि घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रशासनाला तातडीने मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.
