नागपूर : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात तिघांचा मृतदेह आढळून आले आहेत. या तिघांचा उष्माघातामुळे (Heatstroke) मृत्यू (Death) झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कपिल नगर, जुनी कामठी आणि देवलापार परिसरात मृतदेह आढळल्याची माहिती आहे. तिन्ही प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. नागपुरात (Nagpur) दुपारचे चटके असह्य होत असून मंगळवारी 43 तापमानाची नोंद करण्यात आली आहे.