‘Why I killed Gandhi’ या चित्रपटामुळे सध्या महाराष्ट्राचं सामाजिक-राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. कुणी अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेच्या (nathuram godadse) केलेल्या भूमिकेचं समर्थन करतंय तर कुणी त्यांनी ही भूमिका करायला नको होती, असं म्हणतंय. अशात अभिनेते नाना पाटेकर (nana patekar) यांनी राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (dr. amol kolhe) यांना पाठिंबा दिला आहे. ‘अमोल कोल्हे यांनी अभिनय केला. अभिनय केल्याने नथुराम गोडसेच्या विचारांचं समर्थन केलं असं होत नाही’, असं नाना पाटेकर म्हणालेत.