मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadavis) उत्तर सभेनंतर आज काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. देशात केंद्र सरकारनं नागरिकांना बेरोजगारीच्या आगीत ढकललंय, असं पटोले यावेळी म्हणालेत. यावेळी पटोलेंनी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे. इंधन दरवाढीचा मुद्दा देखील पटोलेंनी यावेळी काढला.