पंजाबमधल्या घटनेला तिथलं काँग्रेस(Congress)चं सरकार जबाबदार आहे, असं भासवून या नौटंकीच्या आधारे पाच राज्यांतल्या निवडणुका जिंकता येतात का, असा प्रयत्न भाजपाचा असल्याचा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलाय. या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा हात तर नाही ना, अशी शंका पटोले यांनी उपस्थित केली. खुर्च्या रिकाम्या होत्या म्हणून पंतप्रधानांनी ही नौटंकी केली, असंही ते म्हणाले