Nana Patole | लोकांना आता काँग्रेसच पाहिजे, भंडारा-गोंदियात काँग्रेसचंच वर्चस्व : नाना पटोले

| Updated on: Dec 21, 2021 | 11:29 AM

ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा तांत्रिक मुद्यावर अडवून ठेवला. महाराष्ट्र सरकारनं सर्व पक्षांसोबत चर्चा करुन अध्यादेश काढला होता, मात्र त्याला नंतर विरोध करण्यात आला असं नाना पटोले म्हणाले.

Follow us on

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या सुकळी गावात मतदान केलं. ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा तांत्रिक मुद्यावर अडवून ठेवला. महाराष्ट्र सरकारनं सर्व पक्षांसोबत चर्चा करुन अध्यादेश काढला होता. जळगावचा भाजपचा महासचिव राहुल वाघ सुप्रीम कोर्टात गेला आणि आरक्षण थाबंलं. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातचं नाही तर देशभरात लोकांना काँग्रेस हवी आहे. महाविकास आघाडी सरकार असलं तरी कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे त्यामुळं तीन पक्ष आमने सामने असल्याचं नाना पटोले म्हणाले.