नाशिक : शिंदे फडणवीस सरकारकडून राहुल गांधी आणि काँग्रेसकडून सातत्याने होत असलेल्या स्वतंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान बघता जनतेला त्यांच्या स्वतंत्र चळवळीतील योगदानाची माहिती मिळावी, यासाठी सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाला तेव्हा हे कुठे होते, अशी सडकून टीका आज राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे आणि भाजप सरकारवर केली आहे. स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या बद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप शिंदे गटाच्या नेत्यांकडून राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आला असे पाहायला मिळत आहे. यादरम्यान नाशिक येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संबोधित करताना अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.