महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून नितेश राणे त्यांच्यावरती टीका करायची एकही संधी सोडत नाहीत. नवाब मलिक यांना ताब्यात घेतल्यापासून नितेश राणे महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवरती टीका केली आहे. अनेकदा सरकारच्या विरोधात ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांनी अश्लिल भाषेत टिप्पणी केली आहे. “दीघे साहेबांचं त्यांना नाव वापरायचं असेल. त्यांच्या विरोधात यांना काम करायचं असेल. मग त्या चित्रपटाचं तुम्ही प्रमोशन का करताय. जी स्थिती चित्रपटात दाखवली आहे, तशी सध्या परिस्थिती ठाण्यात आहे का ? दीघे साहेबांनी ठाण्यात प्रत्येक ठिकाणी विकास झाला पाहिजे यासाठी शिवसेनेची स्थापणा केली. पण हा विकास दिव्यामध्ये दिसतोय का ? डान्सबार मटका सगळं सुरू आहे” अशी टीका नितेश राणेनी शिवसेनेवरती केली.