पालखीसोबत चाळीस वारकऱ्यांनाच परवानगी, विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे आदेश. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी वारीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे पायी वारीला मनाई करण्यात आली आहे. तसेच आषाढी एकादशीच्या आसपास पंढरपुरात संचारबंदी लागू केली जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.