पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन होणार आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई तात्काळ देण्याची मागणी या आंदोलनामध्ये करण्यात येणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत करावी असेही असं पंकजा मुंडे म्हणाल्या. या शरमेने मान खाली घालण्यासारख्या गोष्टी असल्याचे म्हणत पंकजा मुंडेंनी सरकारवर घणाघात केला. मला असं वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही, असं विधान काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होत. भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, चांगली गोष्ट आहे. आनंद आहे.