नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण केलं. यावेळी ते विविध मुद्द्यांवर बोलले. गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो दाखवत विचारलं, “ये रिश्ता क्या कहलाता है?”, असं सवाल त्यांनी विचारला. अदानींसाठी नरेंद्र मोदी यांनी नियम बदलले. नियम बदलून अदानींना 6 एअरपोर्टची मालकी दिली गेली, असं म्हणत राहुल गांधी यांची नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.